Header Ads

बुवाजी बुवा हे श्रेष्ठ संतांपैकी एक होते-इंदोरीकर महाराज

 बुवाजी बुवा हे श्रेष्ठ संतांपैकी एक होते-इंदोरीकर महाराज 

बुवाजी बुवा हे श्रेष्ठ संतांपैकी एक होते-इंदोरीकर महाराज




        अहमदनगर (प्रतिनिधी)  : अरणगाव येथे सद्गुरु बुवाजी बुवा महाराजांची संजीवन समाधी मंदिर आहे येथे स्वतःमहाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन केलेली आहे व अशी आख्यायिका आहे की बुवाजी बुवा महाराजांना स्वतः साक्षात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांनी आषाढ शुद्ध द्वादशी येथे उपवास सोडायला येण्याचे वचन दिलेले आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र महान आहे व आज या ठिकाणी अनेक वर्षानंतर पुन्हा दर्शनाचा योग आला असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)  यांनी केले. 




          स्व.विठ्ठल पुंड यांच्या  स्मरणार्थ  अरणगांव,(मेहेराबाद) येथे आयोजलेल्या कीर्तनास येथे आले असता त्यांनी मंदिरात येऊन  दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मंदिराचे पुजारी व विश्वस्त ऋषिकेश जाधव तसेच सर्व विश्वस्त,ग्रामस्थ उपस्थित होते,यावेळी त्यांनी मंदिरातील समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली,मंदिरातील पूजा -अर्चा,प्रसन्नता पाहून मनाला आध्यात्मिक शांतता व समाधान मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

 



        श्री बुवाजी महाराज यांचे समाधी मंदिर   हे  शिवकालीन जुन्या कलेतील बांधकाम असणारे आहे,बुवाजी बुवा यांनी संसार सोडून श्रीक्षेत्र वणी येथे सप्तशृंगी देवीचे 21 दिवस उपासना केली,देवीने दृष्टांत देऊन त्यांना १२ वर्षे  भगवत गीताचे पारायण व गुंडेगाव येथील शिवार तळे येथील वनामध्ये १२  वर्षाची साधना करायचे सुचवले त्याप्रमाणे महाराज या भागात आले तिथे त्यांनी आपला नित्य नेमाने  बारा वर्षे साधना केली तेथील महादेव मंदिर व डोंगरावरील खंडोबा मंदिर यांची  दर्शन,पूजा नित्यनेमाने करत असत व गीतेचे पारायण बारा वर्षे केले.


                       

        याच कालावधीत सदर गावचे जाधव घराण्याचे पाटील यांना   महाराजांची माहिती मिळाली ते त्यांची नित्यनेमाने दर्शन घेण्यास व भेट घेण्यात जात असे त्यांना मूलबाळ नव्हतेमहाराजांच्या आशीर्वादाने दोन मुले झाले त्यामधील एक मुलगा त्यांनी महाराजांच्या सेवेसाठी दत्तक दिला. तेव्हापासून जाधव घराण्याकडे महाराजांची नित्य पूजा-अर्चा,सेवा करण्याचे काम  पिढ्यानपिढ्या ते करत आहे.

 


         पुढे महाराज अरणगाव येथे स्थायिक झाले,महाराजांना एका दिवशी स्वप्नात विठ्ठल रुक्मिणी यांनी मी आलोय तुझ्या भेटीला असा दृष्टांत झाला व नदीपत्रात या ठिकाणी माझी मूर्ती आहे,त्या आणून स्थापन कर असे सांगितले त्याप्रमाणे महाराजांनी मूर्ती नदी पात्रातून काढून आणून मंदिरात स्थापन केल्या व नंतर समाधी घेतली अशी पूर्वीची आख्यायिका आहे.

 


         प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला मंदिरात कीर्तन व खिचडीचा महाप्रसाद वाटप होतो,तसेच आषाढी एकादशी उत्सव रथयात्रा,द्वादशीला उपवास सोडायचा कार्यक्रम-महाप्रसाद ,अश्विन शुद्ध  नवमीला महाराजांचा समाधी दिवस तसेच अनेक उत्सव या ठिकाणी परंपरेप्रमाणे दरवर्षी साजरे केले जातात अशी माहिती देवस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त ऋषिकेश जाधव,सुधाकर जाधव,गणेश जाधव,दत्तात्रय जाधव यांनी दिली 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.